सहज समाधी योग : नाम व त्रिवेणी बंध


मानवी जीवनाची अंतिम शाश्वत अवस्था म्हणजे समाधी...! रामायण - नारायण - पारायण  आध्यात्मिक शृंखला जोपर्यंत आत्मपचनी येत नाही तोपर्यंत गोंधळलेली मनःस्थिती प्राणाच्या माध्यमातून आयाम अथवा विराम घेणार नाही. उर्वरीत जीवन आध्यात्मिक जीवनाच्या क्लीष्ट विचारविनीमायात अडकुन पडु नये जेणेकरुन आपला स्वहेतु साध्य होणार नाही हे टाळता यावं, यासाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून साधकांसाठी सरळ व सहज असे समाधी ज्ञान प्रकाशित करत आहे.



नाम म्हणजे काय ?

जीवनात कोणतेही कर्म करण्यापुर्वी संबंधित कृतीचा अर्थ ज्ञात असणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यायोगे घडत असणाऱ्या क्रिया व परिणामांची अभ्यासात्मक अवतरणिका सहजच ध्यानात येते. नाम हा शब्द आ ( शक्ती ) + नम ( धातु ) अशा संयुक्तिकरणाने त्रिपदी तत्वातुन ब्रम्हांड व्यापुनी राहीला आहे. नाम या शब्दात ' आ ' ही परमशक्ती रामायण - नारायण - पारायण या आत्मिक साधन, साध्य व समाधी अवस्थेला जोडणारी मोलाची कडी आहे. त्याचप्रमाणे ' भव ' या संसारीक विग्रहात अनुग्रहयुक्त ' भाव ' प्रकट होणेसाठी ' आ ' परमशक्तीचाच अविर्भाव होतो. नाम क्रीया सर्वसाधारण नसुन सखोल अंतरीक ज्ञानमार्ग प्रकट करणारी भगवंताची सुक्ष्म कार्यप्रणाली आहे. ही कार्यप्रणाली स्वाध्यायासाठी समजुन घेणे महत्त्वाचे असते. मनाला अवरोध उत्पन्न करवुन देणारी नामशक्ती अमृततुल्य होण्यास अधी तत्वसंधान करता आलं पाहीजे.


नाम प्राणायाम म्हणजे काय ?



मानवी जीवन हंसात्मक श्वासोच्छवासावर आधारित असते. श्वासोच्छवासाचे प्रमाण दैनंदिन जीवनात जितके जास्त तितकी मनाची चंचलता जास्त असते, परिणामी दुःखद दुर्दैवी अंत होणे स्वाभाविक आहे. याउलट मनाची चंचलता ( मना - नाम ) नाम प्राणायामातुन शमवण्याचा प्रयत्न केल्यास मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक स्थैर्यात वाढ होऊन आत्मबळकटीकरण होत असते. नाम प्राणायाम म्हणजे नामसंधानाच्या एकसुत्री माध्यमातून देहांतर्गत सक्रीय असणाऱ्या पंचप्राणांना आयाण अथवा आराम देणे. देहात सक्रीय असणाऱ्या एकुन अकरा रुद्रांपैकी पाच रुद्र म्हणजे प्राण, अपान, समान, व्यान व उदान हे आहेत. नाम प्राणायामाच्या माध्यमातुन प्राण व अपान यांच्या सामायिकरणावर जोर दिला जातो.


नाम प्राणायाम करण्यापुर्वी अपेक्षित असलेली पात्रता यादी खालीलप्रमाणे -

  • १. भक्तीमार्ग हाच प्रमुख मार्ग अशी पक्की धारणा असावी.
  • २. नामस्मरण अर्थयुक्त असायला हवे.
  • ३. मन, काया व वाचा एकसुत्री असावी.
  • ४. आत्मसमर्पणाची तीव्र भावना अंतरी जागृत असावी.
  • ५. सद्गुरु तत्व जाणुन घेण्याची अंतरिक उत्कंठा असावी.
  • ६. शुद्ध शाकाहारी असणे आवश्यक.
  • ७. स्वभाव अंतर्मुख असावा.

योगक्रीयेतील सावधानता

नाम प्राणायाम क्रियेची सुरवात करणे हेतु पुरक - रेचकाचे प्रमाण ठराविक स्वरुपात असते. संबंधित क्रिया करण्यापुर्वी मुलबंधाचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. मुलबंधाशिवाय प्राणायाम सिद्ध होऊ शकत नाही. त्यायोगे अपेक्षित अनुभव येण्यास अडचणीं उत्पन्न होतात. अशा नाम प्राणायामात जबरदस्तीने काहीही केल्यास योग होण्याऐवाजी रोगच बळकावतो याचे ध्यान असायला हवे. नामसंधानात्मक प्राणायाम चित्ताचे लय सर्वसाधारण प्राणायामाच्या तुलनेत अधिक जलाद गतीन करते. त्यायोगे सात्त्विक आचरण अपेक्षित आहे. सद्गुरु महाराजांच्या आत्मनिर्देशनावर आधारलेल्या नाम संधान योगक्रीयेवर आ + परा + आयण तत्व समजुन घ्यावेत.


यौगिक त्रिवेणीं बंध म्हणजे काय ?

मानवी जीवनाची अंतिम शाश्वत अवस्था म्हणजे समाधी...! रामायण - नारायण - पारायण  आध्यात्मिक शृंखला जोपर्यंत आत्मपचनी येत नाही तोपर्यंत गोंधळलेली मनःस्थिती प्राणाच्या माध्यमातून आयाम अथवा विराम घेणार नाही. उर्वरीत जीवन आध्यात्मिक जीवनाच्या क्लीष्ट विचारविनीमायात अडकुन पडु नये जेणेकरुन आपला स्वहेतु साध्य होणार नाही हे टाळता यावं, यासाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून साधकांसाठी सरळ व सहज असे समाधी ज्ञान प्रकाशित करत आहे.

नाम प्राणायामाच्या पुर्वतयारी हेतु शरीरातील प्रमुख तीन प्राण प्रदेशांचे संकुचन करण्याची योग क्रीया म्हणजे त्रिवेणी बंध. ह्या बंधाच्या माध्यमाने देहात स्वयंचलित स्वतंत्र अविर्भावित असणाऱ्या प्राणशक्तीला स्वनियंत्राणात आणले जाते. नाम साधनेच्या माध्यमातून प्राणांना सद्गुरु तत्वाने भारुन त्यांचे लय होण्याची संधानात्मक पुर्वतयारी करावी लागते. त्यायोगे त्रिवेणी बंध हा तर मुळ पाया आहे. या बंधात एकुण तीन बंधाचा समावेश खालीलप्रमाणे करण्यात येतो.



  • १. मुल बंध
  • २. उड्डीयान बंध
  • ३. जालंदर बंध




१. मुल बंध

मुल बंध क्रीया देहाच्या गुद् द्वारासोबत संबंधित आहे. या क्रीयेत सर्वप्रथम गुद् द्वाराची स्वच्छता, नियंत्रण व आकुंचनावर गणेशक्रीयेच्या माध्यमातून भर दिला जातो. देहाच्या गुद् द्वाराच्या दोन अंगुल आत सुक्ष्म शिवलिंगाला साडेतीन वेटोळे मारुन आदी अनादी काळापासुन स्वतःची शेपुट स्वतःच्याच तोंडात घट्ट धरुन आदीमाया कुल कुंडलिनी माता योगनिद्रावस्थेत पडुन असते. सुदृढ मुलबंध क्रीयेने नाम प्राणायामाच्या आत्मसंधानने ही महा कालसर्पिणी योगशक्ती मेलेल्या सापाप्रमाणे स्वतःचे वेटोळेसोडुन अगदी सरळ होते. त्यायोगे तीची परमशक्ती स्वाभावाविकपणे सुषुम्ना मार्गात प्रवाहीत होण्यास सुरवात होते. या संबंधि आत्मसंकेतही साधक करवून घेत असतात. मुल बंध योगक्रीयेने अपान वायुचे उर्ध्वगमन होत असल्याने संबंधित वायुचा स्वनाभीस्थावनावर मोठा प्रभाव पडतो.


२. उड्डीयान बंध

नाभी प्रदेशातील अधोमुखी अमृतकलश उर्ध्वमुखी होणे हेतु संबंधीत बंधाचा वापर करण्यात येतो. यांसंबंधी अधिक माहीती पुढील लेखनात प्रकाशित करण्यात येईल.

३. जालंधर बंध

विशुद्धी चक्रस्थित भागास आपल्या हानुवटीने दाबुन धरणे यांस जालंधर बंध लावणे असे म्हाणतात. ह्या बंधाच्या आकुंचनाने सहज कुंभक अवस्था येऊ लागते. जेणेकरून प्राण कायमस्वरुपी स्थिर होतो. यासंबंधी अधिक माहीती आपण पुढील लेखनात प्रकाशित करु.

नाम प्राणायम स्वतःच्या प्रकृती पुरुषाला अनुसरुन कसं करावं ? त्रिवेणी बंध कसा साधावा यासाठी संबंधित योग क्रियेचे प्रत्यक्ष ज्ञान अपेक्षित असल्यास दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट शी संपर्क करणे.



ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...








0