ही १० लक्षणे देतात जीवनातील वाईट काळ वेळेची घडणारी सुरवात ! Bad Time Phase


आपल्या दैनंदिन आयुष्यात सकाळ ते संध्याकाळ आणि संध्याकाळ ते सकाळ निरनिराळ्या घटनांना सामोरे जावं लागतं. या घटनांच्या पाश्वभुमीवर अशी काही विशिष्ट लक्षणांची आपल्याला अनुभुती येण्यास सुरवात होते जी आपले कष्ट, अनुभव व हित संबंधाची सर्वोतपरी विल्हेवाट लावते. 

या सर्व लक्षणांंचा तुमच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक अस्तित्वावर सखोल परिणाम घडतो जे दुर्लक्षित करणे धोक्याचं ठरेल !


ह्या सर्व आपदांची जर तुम्हाला या दत्तप्रबोधिनी पोस्ट माध्यमातून पुर्वसुचना मिळत असल्यास ती अतिगांभीर्याने घेऊन त्यावर यथाशक्ति व अतीशीघ्र सुयोग्य निवारणात्म भुमिका घ्यावी व आपलं जीवन संरक्षित, सुखमय व समृद्धीकारक करावं ! 

अनायासे जीवनात घडणारी आपदामय १० लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. 
  • १. आपल्या हातुन घडणाऱ्या कष्टांवर बोळा फिरणे अर्थात तोंडाजवळ येणारा कष्टाचा घास अनायासे दुर लोटला जाणे. 
  • २. घरात दैनंदिन भांडण तंटा सुरु होणे.
  • ३. घरातील देवालय फोटो अथवा मुर्ती भंगणे. Link
  • ४. पौर्णिमा व अमावस्येला ताप अथवा ज्वर संबंधित त्रास होणे.
  • ५. स्वप्नांमधे गढुळ पाणी, काळा रेडा व प्रेतरुपे दिसणे
  • ६. अंगावर परीधान करणाऱ्या कपड्यांवर फुल्ली उठणे. 
  • ७. घरातील उकलेले तांदुळ ( भात ) सहा तासात पाणी सोडणे. ( फ्रिज मधे न ठेवलेला )
  • ८. घरातील वाढलेली तुळस गळुन पडणे.
  • ९. घराच्या दरवाज्याजवळ डोम कावळा येऊन ओरडणे. 
  • १०. सुवासिनींच्या कपाळावर कुंकू न टिकणे व गळ्यातील मंगळसुत्र अचानक तुटणे. 



या सर्व लक्षणांद्वारे आपल्या जीवानात मोठ्या आपदेचा धोका कधीही उद्भवु शकतो. यासंबंधी व्यक्ती जितकी अधिक सतर्क व निवारणामय असेल तितक्या धोक्याची पातळी कमी होऊ शकते. 



यासर्व लक्षणांवर नवग्रह, नक्षत्रे व सभोवतालच्या नकारात्मक शक्त्यांचा परिणाम अधिक असतो सोबत जर राहत्या वास्तु विषयी काही गफलत किंवा दोष असेल तर परिणामांची तीव्रता अधिक असते. अर्थात खालीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागा येणाऱ्या वाईट काळ वेळेवर असतो.


यासर्व कारणांनी मानवावर वाईट काळ व वेळेचा सर्वाधिक भडिमार होते अर्थात यथाशक्ति यातुन बचावाचे उपाय अगत्याने अमलात आणावेत.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...








Post a Comment

0 Comments

0