स्वयं त्राटक ( Self Tratak ) - स्वनियंत्रित प्राणशक्तीचा भारलेला प्रवाह.


आपल्या देहात एकुण ४७ शक्तीकेंद्रे आहेत. ह्या सर्व केंद्रात आपल्या बलवान व निरोगी अशा प्राणशक्तीचे स्वनियंत्रित प्रवाह करणें यास ' स्वयं त्राटक ' असे म्हणतात. स्वयं त्राटक विद्या प्रबळ दैवी सान्निध्यासाठी आवश्यक असलेली पुर्व सिद्धावस्था समजावी.

आपल्या देहात एकुण ४७ शक्तीकेंद्रे आहेत. ह्या सर्व केंद्रात आपल्या बलवान व निरोगी अशा प्राणशक्तीचे स्वनियंत्रित प्रवाह करणें यास ' स्वयं त्राटक ' असे म्हणतात. स्वयं त्राटक विद्या प्रबळ दैवी सान्निध्यासाठी आवश्यक असलेली पुर्व सिद्धावस्था समजावी.

आपल्या देहातील प्राणशक्तीला स्वयंनियंत्रित करण्याचे महत्व :
आपला देह नित्य नियमाने एकुण ११ रुद्रवायुंकडुन स्वयंसंचलित होत असतो. या ११ रुद्रांमधे आध्यात्मिक जीवन आधारलेले एकुण ५ रुद्र आहेत त्यात प्राण, अपान, समान, व्यान व उदान यांचा समावेश होतो. या पाच रुद्रांपैकी योग साधनेच्या माध्यमातुन योगीजनांसाठी प्राण व अपान रुद्रांवर लक्ष केंद्रीत केले जाते. संसारीक माणसांनी फक्त प्राण रुद्रावर ध्यान दिले तरी चालेल. प्राण रुद्राच्या देहातील संक्रमणाला प्राणशक्ती असे म्हणतात. ही प्राणशक्ती अत्यंत ताकदवर व पवित्र असते. ह्या प्राणशक्तीच्या देहांतर्गत प्रवाहातुन आपण मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक सुदृढतेवर सदैव स्थिर राहु शकतो.

सर्व सामान्य माणुस व प्राणशक्ती वाहक साधकांमधे फार मोठा फरक अनुभवास येतो त्यात अनूक्रमे प्रगल्भ विचारसरणी, बिकट परिस्थितील संयमी आचरण, योग्य निर्णय घेण्याची क्षमता, न दिसणाऱ्या सभोवताली असणाऱ्या शक्तींशी प्रत्यक्ष संपर्क व अती गुढ, रहस्यमयी आत्मज्ञान ह्या सर्व गुणांचा प्रभाव समाजात संबंधित साधकांमधे दिसुन येतो. संसारीक गाढवांच्या जीवनातील दिशाहीन व संकुचित मनोवृत्तीला असे आत्मसंयमी साधक दयेच्या व कृपेच्याच नजरेने बघत असतात. जीवनात जर आपल्या सोबत मृत्यूनंतर काय येईल तर ते नाम व आत्मशक्ती ह्याची परीपुर्ण जाणीव साधकांना असल्यामुळे ते निश्चिंत व आनंदी असतात. आपण समाजाचे काही देणं लागतो या भावनेनेच ते संसारात राहुन दुःखी पिडीतांना यथाशक्ति मदत करतात.


प्राणशक्तीचे आध्यात्मिक महत्व व फायदे : स्वयं त्राटक साधना

स्वयं त्राटक साधना या आत्मविद्येत आपल्या प्राणशक्तीचे आपल्या देहात ४७ ठिकाणी वहन करण्याचे नियोजन असते. ही स्थाने डोक्यावरील शिखेपासुन ते तळ पायापर्यंत व्यापलेली आहेत. नाथांनी नाथ संप्रदायात विशिष्ट प्रकारचा भस्म संस्कार त्यांच्या ८४,००० अनुयायींना सांगितला. त्यात अनुक्रमे ४७ शक्तीस्थानांपैकी ३६ स्थानांवर भारलेले भस्मशृंगार पद्धतीचे ज्ञान करवुन दिले. त्यायोगे आध्यात्मिक साधनेत अथवा ईतर नामस्मरण सेवेत बाह्य व अंतर्गत विकृतीचा आपल्या चित्तावर घात होत नाही. संबंधित आध्यात्मिक आत्मसाधन निर्विघ्नतेने  पार पाडले जाते. तपोबलात त्रुटीयुक्त काही शंका राहात नाही.

प्राणशक्तीच्या स्वनियंत्रणाने आपण त्राटक साधनेच्या माध्यमातून सर्व दुःख परिहार करु शकतो. प्राणशक्तिच सबंध सृष्टीचे एकमात्र पालनात्मक शक्तीवलय आहे. दिवसकाळी भगवान सुर्य या प्राणशक्तीचे भारवहन संसारात करतात. सुर्यास्तानंतर याच प्राणशक्तीचा वहन ज्योतीस्वरुपात होत असते. त्यायोगे स्वयं त्राटक साधना आपली आत्मज्योत प्रकाश आपल्या बुद्धीपर्यंत पोहोचवणारी एकमेव विद्या साधना आहे. ही साधना आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यायोगे डोळस वृत्ती येण्यास बरीच मोठी मदत होते. आपल्या देहातील प्राणशक्ती वाढ होण्यासाठी तंत्र मंत्र व यंत्र मार्गात बरेच माध्यमी संयोजने व्यक्त केली आहेत.


प्राणशक्ती खालीलप्रमाणे आपण स्वयं त्राटक साधनेच्या माध्यमातून वाढवु शकतो ते खालीलप्रमाणे आहे.

  • १. भगवान सुर्य ऋग्वेदीय मंत्राद्वारे स्वदेहात सुर्यप्राणाचे परिवहन.
  • २. औदुंबर, पिंपळ वृक्षातुन सुक्ष्मक्रीयेद्वारे प्राणशक्तीचे स्वदेहात संचरण.
  • ३. दुर्लभ व निर्जन स्थानातील दैवी शक्तींचे मध्यरात्रीच्या काळभैरव साधनेतुन दैवी प्राणशक्तीचे आवाहन.

आपल्या देहात स्वयं त्राटक साधनेच्या माध्यमातून प्राणशक्तीचे वहन होणेसाठी आपली पंचकोषात्मक क्रीया, पंचभुतात्मक शुद्धीकरणावर विशेष भर प्रारंभीक स्वरुपात देण्यात आला पाहीजे. ह्या पंचकोषात्मक क्रीयेत अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, ज्ञानमय कोष व आनंदमय कोषाचे यथार्थ ज्ञान योग्यप्रकारे आत्मपचनी पडायला पाहीजे. 


अनुक्रमे पंचमहाभुतांचे देह व देहातीत शुद्धीकरणावर भर द्यायला हवा. आपल्याला देहाच्या पलिकडील अनंत अस्तित्व अनुभवण्याची व विलक्षण आनंद निर्विघ्नतेने लुटण्याची सुदृढ अंतरीक ईच्छा असल्यास वरील सर्व साधना करावीच लागेल. या ईतर दुसरा कोणताही मार्ग या मृत्युलोकात उपलब्ध नाही. 

सर्व ठिकाणी आध्यात्माच्या नावान घोर फसवणूकच होत आहे. कोणीही योग्य मार्ग टप्प्याटप्याने सांगत नाही. कारण तेच स्वतः आध्यात्मिक ब्रँडच्या जोरावर भोगीविलासी जीवन जगत आहेत त्यामुळे त्यांना योगीजनांचे वैराग्य व योगज्ञान कोठुन कळणार.

आपल्या देहात ईतके रहस्य लपलेले आहेत की, फक्त ओळखण्याची ईच्छा असणाऱ्यांना हाच वर्तमान जन्म अपुरा पडेल. ह्दयातील आत्म्यापासुन ते सहस्त्रारातील परमात्म्यापर्यंत अनंत शक्तींचा अनुभव योगीजनांना येत असतो. तो आनंद आणि दत्त सान्निध्यात रंगलेल्या साधुला बाह्यदुनियेचा विसर पडणे हे तर स्वाभाविकच आहे.


स्वयं त्राटक साधना सुरवात कराण्याहेतु आपली शारीरीक क्षमतेचे व आचरणाचे योग्य अनुमान निर्धारीत करावे लागते. ह्या आत्मसंतुलनाच्याच आधारावर अत्यंत शक्तीमय अशी प्राणशक्ती आपण स्वयंनियंत्रित करु शकतो. त्यायोगे स्वहीत व जनहीतही महाराजांच्या ईच्छ्येने साधता येईल.


महत्त्वाची टिप...

संबंधिक साधनाक्रीया संबंधित साधना तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली कराव्यात.


0