वास्तु व वृक्ष रहस्य Vastu And Tree Relation - Real unknown secrets explained


वृक्षवल्लींचा प्रत्यक्ष संबंध स्थुल मानवी देहाशी प्राणवायुच्या स्वरुपात अर्थात श्वासोच्छ्यवासाच्या माध्यमातून आपण दररोज अनायासे अनुभवत असतोच. त्याचप्रमाणे ह्याच वृक्षवल्लींचा प्रत्यक्ष संबंध भुगर्भापासुन ते आकाश तत्वापर्यंत व्यापुन राहीलेल्या वास्तु भुखंडाच्या प्राणशक्तीशी जोडलेला असतो. वास्तु पुरुष या लिंकमधे संबंधित वास्तुतील प्राणशक्ती म्हणजेच पुराण वास्तु दैत्य आसे संबोधले आहे. याअधी कोणीही जे रहस्य उलगडले नाही त्याच कार्यकारण उर्जेचे निवडक विश्लेषण दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून प्रकाशित करत आहोत.

वृक्षवल्लींचा प्रत्यक्ष संबंध स्थुल मानवी देहाशी प्राणवायुच्या स्वरुपात अर्थात श्वासोच्छ्यवासाच्या माध्यमातून आपण दररोज अनायासे अनुभवत असतोच. त्याचप्रमाणे ह्याच वृक्षवल्लींचा प्रत्यक्ष संबंध भुगर्भापासुन ते आकाश तत्वापर्यंत व्यापुन राहीलेल्या वास्तु भुखंडाच्या प्राणशक्तीशी जोडलेला असतो. वास्तु पुरुष या लिंकमधे संबंधित वास्तुतील प्राणशक्ती म्हणजेच पुराण वास्तु दैत्य आसे संबोधले आहे. याअधी कोणीही जे रहस्य उलगडले नाही त्याच कार्यकारण उर्जेचे निवडक विश्लेषण दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून प्रकाशित करत आहोत.

चल आणि अचल शक्तीवलयांमधील अतुट व अनाकलनीय भाग असणाऱ्या चल अर्थात अस्थिर शक्तीवलयांकीत स्थुल देहधारी मानवी जीवनावर व ईतर प्राणीमात्रांवर अचल अर्थात स्थिर शक्तीवलयांकीत म्हणजेच प्राणशक्तीमय वास्तु व वृक्षांचा फार मोठा परिणाम होतो.


वास्तु ( अचल ) + वृक्ष ( अचल ) + मानव ( चल ) या प्राणशक्ती त्रिकोणातील मानवी बाजु वर कालागमन, परिस्थिती व वेळेचा ९५% प्रभाव पडतो. हा प्रभाव त्या मानवाच्या मानसिक, आर्थिक, शारिरीक, सामाजिक व आध्यात्मिक विषयांना अनुसरून असतो. त्यायोगे जर मानवाने या त्रिकोणीय सुक्ष्म शृंखलेचा व्यवस्थित प्रभुत्ववादी अभ्यास केल्यास ; जीवनात सर्वांगीण विजयश्री मिळण्यात फार विलंब राहाणार नाही. याउलट जर मानवाने सत्य परिस्थिती डावलुन निष्काळजीपणाने दुराचार केला तर सर्वनाशही कोणीही रोखु शकणार नाही.


दत्तप्रबोधिनी तत्वांतर्गत सुक्ष्म आध्यात्मिक ब्रम्हांण्डीय उर्जा प्रवाहाद्वारे सद्गुरु महाराजच संबंधित वास्तु + वृक्ष + मानव कार्यप्रणाली अवगत करवुन देतात. या संबंधी प्रार्थमिक स्वरुपात वास्तु पुरुषाची सुस्थीती अथवा अवस्थीती ओळखुन घ्यावी.


वास्तु निर्माण हेतु ' मय ' नामक दानवाने पुर्ण भुखंडालाच वास्तुक्षेत्र म्हणुन धारण केलेले असते. अशा भुखंडावर वास्तु निर्माण होणे हा विषय अगतिक आहे. मयमतम् तंत्रात तसा खालीलप्रमाणे उल्लेख आहे...


भूमिप्रासादयानानि शयनं चचतुर्विधम् l
भूरैव मुख्य वस्तु स्यात् तत्र जातानि यानिहि ll


वास्तु क्षेत्रात वृक्षांचे महत्व :

मोठ्या वृक्षांचे स्थान पुर्व व उत्तर दिशेला असणे अयोग्य आहे याचे कारण असे की काही ठराविक महावृक्ष पुर्व व उत्तराभिमुख वास्तु द्वाराच्या दिशेने निशितकाळात पुढील बाजुने येणारी नकारात्मक उर्जा पाठीमागे म्हणजे वास्तुच्या दिशेला परावर्तित करतात. त्यायोगे घरातील सदस्यांना अतिरिक्त क्लेशाला बळी पडावे लागते. अशा नकारात्मक उर्जेचा प्रवाह दक्षिण व पश्चिम दिशेला होत असतो. ज्या मध्यस्थी वास्तु येण्याने प्रभावित होते. त्यायोगे अशा महावृक्षांना दक्षिण व पश्चिम दिशेला लावावेत.



वृक्षवल्लींचा प्रत्यक्ष संबंध स्थुल मानवी देहाशी प्राणवायुच्या स्वरुपात अर्थात श्वासोच्छ्यवासाच्या माध्यमातून आपण दररोज अनायासे अनुभवत असतोच. त्याचप्रमाणे ह्याच वृक्षवल्लींचा प्रत्यक्ष संबंध भुगर्भापासुन ते आकाश तत्वापर्यंत व्यापुन राहीलेल्या वास्तु भुखंडाच्या प्राणशक्तीशी जोडलेला असतो. वास्तु पुरुष या लिंकमधे संबंधित वास्तुतील प्राणशक्ती म्हणजेच पुराण वास्तु दैत्य आसे संबोधले आहे. याअधी कोणीही जे रहस्य उलगडले नाही त्याच कार्यकारण उर्जेचे निवडक विश्लेषण दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून प्रकाशित करत आहोत.

नवीन वास्तु निर्माण कार्यात सभोवतालचे वायुतत्व शुद्ध व नियंत्रित होण्यासाठी जे वृक्ष आहेत त्यांची सुरक्षितता ध्यानात घेऊनच नविन वृक्षारोपण करावेत. औदूंबर, वटवृक्ष, पिंपळ व कडुलिंबाच्या वृक्षातुन एका रात्री ईतक्या प्रमाणात प्राणवायु सोडला जातो की ; त्यायोगे सरासरी २५ जण श्वसन करु शकतात.


यो वाटिकां राजपथ: समीपे स्विष्टां तथा कूपसमन्वितांच।
स्वर्ग च  वासं  लभते  मनुष्यश्रचतुर्युगं  सर्वसूखैरूपेत: ॥

वास्तुला अनुसरुन वृक्षांची स्थिती अशाप्रकारे असायला हवी की ; सकाळीची सुर्यकिरणे सरळ गृहप्रवेश करु शकतील. याचं एक वेगळं आध्यात्मिक महत्त्व आहे जे नंतर कधीतरी सांगीन...


वास्तुशास्त्रमते घराच्या सर्व दिशांना असणाऱ्या वृक्षांचे विश्लेषण -

संबंधित वास्तुला त्यांच्या दिशानिर्देशनाद्वारे त्या दिशा अथवा द्वार उर्जेतील अतींद्रीय शक्ती असलेल्या वृक्षांची सुची खालीलप्रमाणे देत आहे.


  • १. ईशान्य - आवळा
  • २. नैऋत्य - चिंच
  • ३. अग्नेय - डाळींब
  • ४. वायव्य - बेलाचे वृक्ष


गृह वास्तुजवळ दुधयुक्त वृक्ष असल्यास ; लक्ष्मीचा नाश होतो. काट्यांच्या वृक्षाद्वारे शत्रुभय व विषारी फळाच्या वृक्षाद्वारे संतती त्रास होतो. या वृक्षांच्या समीधाही निरुपयोगी असतात. जर गृह वास्तु जवळ अशुभ वृक्ष असल्यास शुभ वृक्षांची लागवड केल्यास त्यायोगे अशुभ प्रभाव कमी होतो.

घरात तुळस अवश्य लावावी. सर्वतोपयोगी फलदायक आहे. दक्षिण दिशेला तुळस लावू नये तसेच रविवारी तुळस वृक्षाला स्पर्शही करु नये.


हस्त, पुष्य, अश्विनी, उत्तरा भाद्रपक्ष, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, रोहिणी, विशाखा, मृगशिरा, मूल, शतभिषा नक्षत्रावर शुभ वृक्ष लागवड करणे हीतकारक आहे.


घराच्या बांधकामासाठी मंदिर, स्मशान व बागेच्या लाकडांचा वापर करु नये. साग, शिसम, बर्मा व आंब्याची लाकडे वापरु शकता.


घरात जर वादविवाद असतील तर ; मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजुला तुळस व डाव्याबाजुला केळ्याचे वृक्ष लावावे. तसेच सर्व समृद्धि हवी असल्यास ईशान्य बाजुस पाण्यातील वनस्पती लावावी.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...




0